मिरची ही भारतातील सर्वात महत्वाची व्यावसायिक पिके आहे. हे जवळजवळ देशभरात घेतले जाते. जगभरात मिरचीच्या 400 हून अधिक जाती आढळतात. याला गरम मिरची, लाल मिरची, गोड मिरची, बेल मिरपूड देखील म्हणतात.
आपल्या दैनंदिन आहारामध्ये विशिष्ट पदार्थांना चव येण्यासाठी मिरची महत्त्वाची भूमिका बजावते. मिरची या पिकाचे शास्त्रीय नाव चिल्ली (Chilli) हे असून मिरची कूळ सोलानासी (Solanaceae) हे आहे. प्रजाती (Genus) कॅप्सिकम (Capsicum) असून मिरची हे वनस्पतिनाव “कॅप्सिकम ॲन्युअम” (Capsicum annuum) आहे.
सुमारे 7500 वर्षांपूर्वीपासून कॅप्सिकम फळे मानवी आहाराचा एक भाग आहेत, आणि अमेरिकेत सर्वात प्राचीन लागवड केलेल्या पिकांपैकी एक आहे, मिरचीची लागवड करण्याच्या उत्पत्तीची उत्पत्ति सुमारे 6000 वर्षांपूर्वी ईशान्य मेक्सिकोमध्ये सापडली आहे. ते मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये लागवड केलेल्या पहिल्या स्वयं-परागकांपैकी एक होते.
पेरू हा सर्वात जास्त लागवडीचा कॅप्सिकम विविधता असलेला देश मानला जातो कारण हे विविधीकरणाचे एक केंद्र आहे जेथे कोलंबियाच्या पूर्वकाळात पाचही पाळीव जातींची वाणांची ओळख करून दिली, पिकविली आणि खाल्ली. बोलिव्हिया हा असा देश मानला जातो जेथे वन्य कॅप्सिकम मिरपूडची सर्वात मोठी विविधता वापरली जाते. बोलिव्हियन ग्राहक दोन मूलभूत प्रकारांमध्ये फरक करतात: उल्युपिकास, सी. एक्झियम, सी. कार्डिनेसी, सी. एशबॉघी आणि सी. कॅबलेरोइ लँड्रेसेस यासह लहान गोल फळांसह प्रजाती; आणि सी बॅकॅटम व्हेरसह लहान वाढवलेल्या फळांसह एरिव्हिव्हिस. बॅकॅटम आणि सी. चेकोन्स व्हेरिएटी वाण.
जगातील सर्वात लोकप्रिय मिरची “नागा जोलोकिया” ची लागवड भारताच्या तेजपूरच्या छोट्याशा गावात असमच्या डोंगराळ प्रदेशात केली जाते. भाज्या, मसाले, मसाले, सॉस आणि लोणच्यासाठी वेगवेगळ्या वाणांची लागवड केली जाते. मिर्चीला भारतीय आहारात महत्त्वपूर्ण स्थान आहे. ही स्वयंपाकघरातील एक अनिवार्य वस्तू आहे, कारण दररोज तो एका स्वरूपात किंवा इतर पदार्थांच्या रूपात मिसळला जातो. दर मस्तकात वापरल्या जाणार्या मसाल्यांमध्ये वाळलेल्या मिरच्याच्या फळांचा वाटा मोठा असतो. सध्या, जगभरात मिरचीचा वापर मसाल्याच्या रूपात केला जातो आणि तसेच पेये आणि औषधे तयार करण्यासाठी देखील वापरला जातो.
‘कॅप्सॅथिन’ या रंगद्रव्यामुळे मिरचीच्या काही जाती लाल रंगासाठी प्रसिद्ध असल्यास, इतरांना ‘कॅप्सॅसिन’ असे संबोधिले जाते. मिरचीमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असतात, विशेषत: व्हिटॅमिन ए आणि सीमध्ये ते पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह देखील भरलेले असतात. मिरचीचा त्रास वेदना निवारणासाठी फार पूर्वीपासून केला जात आहे कारण ते वेदना संदेशवाहकांना अडथळा म्हणून ओळखतात, मिरचीच्या मिरच्याचा अर्क संधिवात, डोकेदुखी, बर्न्स आणि मज्जातंतुवेदनांच्या वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो. असा दावा केला जात आहे की त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याची शक्ती आहे. ते आतड्याच्या परजीवीपासून मुक्त होण्यास देखील उपयुक्त आहेत.
मिरचीचे उत्पादन महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात मोठया प्रमाणात घेतले जाते. तसेच मिरची पीक हे महाराष्ट्रातातील तिन्ही हंगामात संवदेनशील असल्यामुळे या पिकाची लागवड मोठया प्रमाणावर केली जाते. शिवाय कीड व रोगांचा प्रादुर्भाव काही अंशी कमी आढळून येतो. त्यामुळे मिरचीचे महत्त्व वाढत असल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिरची या पिकाचे उत्पादन घेण्यास मोठा वाव आहे.
महाराष्ट्रात मिरचीची बाजारपेठ नागपूर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद नांदेड लासलगाव अमरावती, धुलिया, चंद्रपूर, जळगाव अंजनगाव, मोर्शी, दांडाचि, चिमूर, आमनेर, अचलपूर आणि सांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण राज्यातून या ठिकाणी व्यापारी आपली मिरची बाजारात विक्रीसाठी आणत असत त्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावतात.
मिरचीचे महत्त्व
कॅप्सैसीन हे पदार्थाचा एक शक्तिशाली अवरोधक आहे जो दाहक प्रक्रियेशी संबंधित न्यूरोपेप्टाइड आहे. तिखट मिरचीचे गरम सर्वात लोकप्रिय वाणांमध्ये नागा जलोकिया, हॅबेरो आणि स्कॉच बोनेट मिरचीचा समावेश आहे. जॅलेपीओस त्यांच्या उष्णता आणि कॅपसॅसिन सामग्रीमध्ये नंतर आहेत, त्यानंतर स्पॅनिश पिमिटोस आणि नाहिम आणि हंगेरियन चेरी मिरपूड यासह सौम्य वाण आहेत. संधिवात, सोरायसिस आणि मधुमेह न्यूरोपॅथीशी संबंधित वेदनांसह संवेदी मज्जातंतू फायबर विकारांवर प्रभावी उपचार म्हणून कॅप्सॅसीनचा अभ्यास केला जात आहे. जेव्हा जनावरांना जळजळ होणाऱ्या संधिवात उद्भवणाऱ्या पदार्थाने इंजेक्शन दिले जाते तेव्हा त्यांना कॅप्सैसिन असणारा आहार दिला असता त्यांनी संधिवात सुरू होण्यास उशीर केला होता आणि पंजाच्या जळजळात लक्षणीय घट झाली होती.
अलीकडे नवनवीन सुधारित वाण आणि लागवड तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मिरची पिकातील प्रतीहेक्टरी उत्पादकता वाढत जात आहे. मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असून फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. मिरचीत तिखटपणा हा कॅप्सिसीन द्रव्यामुळे, तर लाल रंग कॅप्सानथिन या रंगद्रव्यामुळे येतो.
मिरची उत्पादन
सन 2016 मध्ये जगभरात अंदाजे 34.5 दशलक्ष टन हिरवी मिरची आणि 3.9 दशलक्ष टन सुक्या मिरचीचे उत्पादन झाले. चीन जगातील सर्वात मोठ्या हिरव्या मिरच्या उत्पादनात होता आणि तो जागतिक स्तराच्या निम्म्या भागामध्ये होता. सुक्या मिरचीचे जागतिक उत्पादन ताज्या उत्पादनाच्या नवव्या टप्प्यात होते आणि भारत हा जगातील 36% कोटा आहे.
भारतातील राज्यानुसार मिरचीचे उत्पादन (1000 मेट्रिक टन मध्ये) सन 2018
अ.क्र. | राज्य | उत्पादन (1000 मेट्रिक टन मध्ये) |
1 | तेलंगणा | 340.8 |
2 | कर्नाटक | 260.14 |
3 | मध्य प्रदेश | 244.55 |
4 | ओरिसा | 69.17 |
5 | गुजरात | 22.07 |
6 | आसाम | 20.61 |
7 | पंजाब | 14.08 |
8 | राजस्थान | 13.34 |
9 | उत्तर प्रदेश | 12.58 |
10 | मिझोरम | 10.92 |
स्त्रोत : https://www.statista.com/statistics/870940/chili-production-by-state-india/
मिरची सुधारित जाती
मिरचीमध्ये निरनिराळे सुधारीत वाण विकसित केले असून फळांच्या आकारामानात खूप विविधता आढळून येते. फळांची लांबी 1 सें.मी. पासून 15 ते 20 सें.मी. असू इतकी शकते. मिरची पिकाच्या मुख्यत: पुसा ज्वाला, एन.पी. 46, पंच सी – 1, संकेश्वरी – 32, सिंधूर, जवाहर – 218, कल्याणपूर – 1, जयंती, सुरक्ता, परभणी तेजस, कोकण किर्ती, सळवाडी सिलेक्शन, अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी इत्यादी जाती विकसित केल्या आहेत.
1) अग्निरेखा
ही जात दोडांईचा आणि ज्वाला यांचा संकरातून निवड पद्धतीने तयार केली आहे. या जातीची जाडे मध्यम उंचीची असतात. उन्हाळी आणि खरीप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशी जात आहे. तसेच हिरव्या फळासाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. वाळलेल्या लाल मिरचीचा उतारा कमी मिळतो. फळाची लांबी 10 ते 12 सें.मी. असून जाडी 0.8 ते 1.0 सें.मी. आहे. पिकलेल्या मिरचीचा रंग लालभडक आहे. हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगा आहे. हिरव्या मिरचीचे 100 ते 120 क्विंटल उत्पन्न मिळते आणि वाळलेल्या मिरचीचे हेक्टरी उत्पन्न 20 ते 25 क्विंटल मिळते. भूरी आणि मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. या जातीच्या फळांना स्थानिक व शहरी बाजारपेठेत चांगला बाजारभाव मिळतो.
2) फुले ज्योती
या जातीची झाडे मध्यम उंचीची आणि परसरणारी असतात. जमिनीपासून 3-4 फांद्या फुटतात. पाने हिरवी आणि आकाराने मोठी असतात. फळे घोसात लागतात आणि एका घोसात सरासरी 4-5 फळे असतात. सर्व फळे एकसारखी वाढतात आणि एकाचवेळी काढणीस तयार होतात. फळांची लांबी 6 ते 7 सें.मी. असते तर जाडी 0.8 ते 1.0 सें.मी. असते. फळांचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून तो चांगला टिकतो. रोपाच्या लागवडीनंतर 55 ते 60 दिवसात हिरव्या मिरचीचा तोडा मिळतो. तर पिकलेल्या मिरचीचा पहिला तोडा 80 ते 90 दिवसात मिळतो. हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 180 ते 225 क्विंटल मिळते. ही जात भुरी रोगाला बळी पडते. तर फुले किडे आणि पांढरी माशी या किडींना चांगल्याप्रकारे प्रतिकार करते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे.
3) फुले सई
ही जात पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात पंत सी – 1 आणि कमंडलू या दोन वाणाच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीच्या मिरच्या गर्द हिरव्या रंगाच्या असून वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असतो. फळे 7 ते 8 सें.मी. लांब असतात. झाडे मध्यम उंचीची असतात. कोरडवाहू क्षेत्रात 13 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी वाळलेल्या मिरचीचे उत्पादन येते.
मिरचीच्या जाती निवडताना घ्यावयाची काळजी
मिरचीचा तिखटपणा, आकार आणि उपयोग यावरून अनेक प्रकार आहेत. असे प्रकार किंवा जाती त्या त्या विभागात सर्रास वापरल्या जातात. मिरचीची जात निवडताना प्रामुख्याने भरपूर उत्पादन, चांगली गुणवत्ता, चांगला आकार व चांगली लांबी, गर्द हिरवा किंवा फिक्कट हिरवा रंग, लाल मिरचीसाठी गर्द लाल रंग व किडीस प्रतिकारक्षम, तिखटपणा व चांगला बाजारभावा मिळणे या महत्त्वाच्या बाबींचा विचार करून योग्य त्या जातीची निवड लागवडीसाठी करावी.
हवामान
मिरचीला उष्ण व दमट हवामानात पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही हंगामात करता येते. परंतु हिवाळी हंगामात 20 ते 25 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यामुळे मिरची पिकाची वाढ चांगली होत नाही आणि त्यामुळे फूल धारणा व फळधारणा कमी प्रमाणात होते. त्यासाठी 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते. हंगामात तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक गेल्यास फुलांची गळ होऊन उत्पन्नात घट येते.
जमीन
मिरचीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात खते घातल्यास चांगले पीक येऊ शकते. मिरची पिकाला उष्ण आणि दमट हवामानात पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले मिळते. हिवाळी हंगामात 20 ते 25 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होते.
लागवड हंगाम
मिरची हे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतात. खरीप हंगामामध्ये बियांची पेरणी मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत करतात. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये बियाणांची पेरणी करावी.
बियाणे
मिरचीच्या योग्य जातीची निवड केल्यानंतर रोपे तयार करण्यासाठी चांगली उगवणक्षमता असलेले, उत्कृष्ट दर्जाचे, अत्यंत खात्रीशीर बियाणे खरेदी करावे. साधारणपणे हेक्टरी 1.0 ते 1.25 किलो बी पुरेसे होते. बियाणांची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियणास 2 ते 3 ग्रॅम थायरम चोळावे. रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करावेत. बियाणांची पेरणी केल्यापासून 4 ते 6 आठवड्यांनी आणि 15 ते 20 सें.मी. वाढली की रोपांची लागवड करावी.
बीजप्रक्रिया
मिरची पेरणी करण्यापूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2 ते 3 ग्रॅम थायरम चोळावे. कारण जमिनीत असणाऱ्या सुप्तअवस्थेत किडींपासून संरक्षण होते व मिरचीची उगवण क्षमता वाढून पिकांवर येणाऱ्या कीड व रोगांपासून संरक्षण होते.
रोपवाटिका
मिरची लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपांवर अवलंबून असते. रोपे तयार करण्यासाठी तीन बाय दोन मीटर लांबी-रुंदीचे आणि 20 सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादीवाफ्यावर चांगले कुजलेले दोन घमेले शेणखत, 30 ते 40 ग्रॅम मॅंकोझेब तसेच फोरेट (10 टक्के दाणेदार) 15 ग्रॅम प्रत्येक वाफ्यात टाकावे आणि मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीला समांतर दर 10 सेंमी अंतरावर खुरप्याने 2 ते 3 सें.मी. खोल ओळी कराव्यात. या ओळींत बियाण्यांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकावे. हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर 5 ते 6 दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी रोपांच्या वाढीसाठी प्रत्येक वाफ्यात 50 ग्रॅम युरिया द्यावा.
जास्त प्रमाणात युरिया खताचा वापर टाळावा. त्यामुळे रोपे उंच वाढतात आणि लुसलुशीत राहतात. रोपांची लागवड केल्यानंतर रोपे मरण्याचे प्रमाण वाढू नये यासाठी योग्य प्रमाणात त्यांचा वापर फायद्याचा ठरतो. पेरणी केल्यापासून 40 ते 50 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.
रोपवाटिकेत रोपे निरोगी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोपे उगवून आल्यापासून 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 25 ते 30 ग्रॅम फोरेट दोन ओळींच्या मधून द्यावे.
रोपे 3 ते 4 आठवड्यांची असताना शिफारस केलेले कीटकनाशक आणि मॅंकोझेब 20 ते 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे फुलकिडे, तुडतुडे आणि कोळी याचे नियंत्रण होऊन पर्णगुच्छ या रोगापासून संरक्षण होते.
रोपांची लागवड
मिरचीची लागवड सरी वरंब्यावर करतात. उंची आणि पसरट वाढणाऱ्या जातींची लागवड 75 बाय 60 किंवा 60 बाय 60 सें.मी. अंतरावर तर बुटक्या जातीची लागवड 60 बाय 45 सें.मी. अंतरावर करावी. काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. रोपांची लागवड करताना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने तोडावीत.
जास्त उंचीची रोपे असल्यास रोपाचा शेंडा कट करून लागवडीसाठी वापरावीत. लागवडीपूर्वी रोपे विशेषत: पानांचा भाग पाच मिनिटे प्रोफेनोफॉस (50 टक्के ईसी) 10 ग्रॅम अधिक मॅंकोझेब 25 ग्रॅम अधिक पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे. या मिश्रणात रोपे बुडवून काढावीत आणि लागवड करावी.
आंतरमशागत
मिरचीच्या शेतामध्ये आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे. जमिनीलगत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. फुले येण्याच्या सुमारास झाडांना मातीची भर द्यावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत आणि नैसर्गिक वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण होईल.
खत व्यवस्थापन
लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे. 100: 50:50 किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रती हेक्टरी द्यावे. अर्धा नत्राचा हप्ता लागवडीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी म्हणजे फूल आणि फळधारणेच्या वेळी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
मिरचीला पाणी गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते. जमिनीचा प्रकार वा मगदूर, पाऊसमान, तापमान व हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात गरजेप्रमाणे 15 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळ गळण्याचा धोका असतो. म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
पीकसंरक्षण
अ) मिरची प्रमुख किडी
मिरचीवर प्रामुख्याने फुलकिडे, कोळी, फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. फुलकिडे पानांच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वाळतात. पाने लहान होतात. यालाच स्थानिक भाषेत बोकड्या किंवा चुरडा मुरडा म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. कोळी कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानाच्या कडा खालील बाजूस वळतात. देठ लांब होतात आणि पाने लहान होतात.
चुरडा मुरडा होण्यास कोळी कीडही कारणीभूत ठरते. या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात जास्त आढळतो. फळे पोखरणाऱ्या किडींची अळी फळाच्या देठाजवळील भाग खाते. त्यामुळे फळे गळून पडतात. या सर्वप्रकारच्या किडीमुळे 10 ते 30 टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते.
एकात्मिक कीड नियंत्रण
- वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी कीड प्रतिकारक जातींची लागवड करावी.
- बियाण्यास कार्बोसल्फान 30 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बियाणे सुकल्यावर एक तासाने ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- बीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (दोन बाय एक मीटर) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत फोरेट दाणेदार 20 ग्रॅम टाकावे. किंवा डायमिथोएट 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
- लागवडीवेळी इमिडाक्लोप्रिड 10 मिली किंवा कार्बोसल्फान 30 मिली अधिक ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतर लागवड करावी.
- लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी निंबोळी पेंड हेक्टरी 400-500 किलो या प्रमाणात टाकावी.
- पुनर्लागवडीनंतर पहिली फवारणी सायपरमेथ्रीन 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यानंतर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्क चार टक्के याचीही फवारणी गरजेनुसार करावी.
- फवारणीसाठी आलटून-पालटून कीटकनाशकाचा वापर करावा.
ब) मिरची प्रमुख रोग
मिरचीवरील महत्त्वाचे रोग म्हणजे फळ कुज, फांद्या वाळणे, भुरी आणि लीफ कर्ल व्हायरस हे होय. फळकूज आणि फांद्या वाळणे या रोगांच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची फळावर आणि पानांवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळांवर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात. फांद्या वाळणे या रोगाची सुरवात शेंड्याकडून होते. प्रथम शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात.
पाने आणि फाद्यांवर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे होतात. या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा, तसेच मॅंकोझेब किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड यापैकी एक बुरशीनाशक 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 15 दिवसांनी फवारावे. साधारण 3-4 फवारण्या कराव्यात.
भुरी : या रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावार आणि खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बळावल्यास पाने गळून पडतात.
नियंत्रण : या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. नंतरच्या दोन-तीन फवारण्या दर 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
लीफ कर्ल व्हायरस : लीफ कर्ल व्हायरस (चुरडा-मुरडा) या रोगाचा प्रादुर्भाव फुलकिडे, मावा, कोळी आणि विषाणूंमुळे होतो. या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानांची वाढ खुंटते आणि झाड रोगट दिसते.
नियंत्रण : रोगाच्या नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर 25 दिवसांनी 10 लिटर पाण्यात मॅंकोझेब 25 ग्रॅम अधिक पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस 10 मिली यांचे मिश्रण दर 15 दिवसांनी फवारावे. साधारणपणे चार ते पाच फवारण्या कराव्यात. रोपवाटिकेतही शिफारसीनुसार रोपे कीडनाशकांच्या द्रावणांत बुडवून लावावीत.
काढणी
मिरची पूर्ण वाढलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी. हिरव्या मिरचीची तोडणी लागवडीपासून अंदाजे 60 ते 70 दिवसांनी सुरू होते आणि पुढे 3 ते 4 महिने तोडे सुरू राहतात. मिरचीचे सर्वसाधारण 10 ते 12 तोडे मिळतात.
उत्पादन
मिरची जातीपरत्वे उत्पादनात विविधता दिसून येते. हिरव्या मिरचीचे 120 ते 180 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. तर वाळलेल्या मिरचीचे 15 ते 21 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. परंतु मिरची उत्पादनात महत्त्वाचे घटक म्हणजे उच्च दर्जाचे बियाणे, लागवड व्यवस्थापन, पीकसंरक्षण, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान, इत्यादी बाबींवर मिरचीचे उत्पादन अवलंबून असते.
मिरची निर्यातीसाठी आवश्यक बाबी
- फळे नाजूक आणि हिरव्या रंगाची असावीत.
- हिरव्या मिरची फळाची लांबी 9 ते 10 सें.मी. असावी.
- फळे रोग व किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी.
- खराब किंवा डाग पडलेली, पिवळी फळे निवडून वेगळी करावीत.
- फळांची प्रतवारी करूनच निर्यातीसाठी पाठवावी.
- फळांच्या पॅकिंगसाठी ज्यूटच्या धाग्यापासून तयार केलेल्या 9 बाय 10 मेश प्रति चौरस इंच पिशव्याचा वापर करावा आणि हवा खेळती राहावी.
- टिश्यू पेपरचा वापर फळे गुंडाळण्यासाठी करावा जेणे करून बाष्पीभवन कमी करून टिकण्याचा कालावधी वाढविण्यासाठी उपयोग होतो.
- फळे तोडणीवेळी शक्यतो थंड वातावरण असावे. तसेच तापमान 7-10 अंश सें.ग्रे. आणि आर्द्रता 90-95 टक्के असावी.
- पॅकिंगसाठी टिश्यू पेपरचा वापर करावा. कोरोगेटेड (सी.एफ.बी) फायबर बोर्ड बॉक्स वापरावेत.
- निर्यातीवेळी जास्तीत जास्त थंड हवा खेळती राहील याचा विचार करावा.
- निर्यातीसाठी फळे पाठविण्यासाठी फळांवर किटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकाचे अवशेष हे एम.आर. लेव्हलपेक्षा जास्त नसावेत.
- ज्या बुरशीनाशकावर किंवा किटकनाशकावर भाजीपाला पिकामध्ये वापरण्यास बंदी घातली आहे अशी औषधे फवारणीसाठी वापरू नयेत.
संदर्भ
- डॉ. मधुकर भालेकर व इतर, मिरची लागवड तंत्रज्ञान, लेखक अखिल भारतीय समन्वित भाजीला सुधार प्रकल्प, म. फु. कृ. वि., राहुरी जि. अहमदनगर 413722
- https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-chilli-cultivation-technology-agrowon-maharashtra-1811
- डॉ. बी. टी. पाटील व इतर, मिरची लागवड सुधारित तंत्रज्ञान, अखिल भारतीय समन्वित भाजीला सुधार प्रकल्प, म. फु. कृ. वि., राहुरी जि. अहमदनगर 413722
- https://www.digitalbaliraja.com/Encyc/2018/7/9/Chilli-planting-improved-technology-article-by-Baliraja-Magazine.html
- www.wikipedia.com
- www.vikaspedia.com
- www.encyclopedia.com
Chilli Production
खूप छान! नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी होईल.
Very good
Nice
Nice
Very good information hundred percent benefit in pharma